Posts

Showing posts from April, 2018

जर असते इंटरनेट महाभारत काळात....

Image
जर असते इंटरनेट महाभारत काळात.... तर नसते गेले श्रीकृष्ण द्रौपदीच्या चीरहरणात, तिच्या बचावला.. त्यांनी देखील केला असता डी.पी. आपला ब्लॅक नसता घडला द्यूताचा तो खेळ... ऑनलाईन मिटिंगनेच कदाचित साधला असता मेळ दु:शासनाने देखील डायरेक्ट वस्त्र हरणाऐवजी तिला केले असते ट्रोल... #द्रौपदी हॅशटॅगचे, त्यासभेत निराळेच असते मोल धृतराष्ट्राने कदाचित ट्विट करूनच केली असती घटनेची ‘कडी निंदा’ आणि केवळ बोर्ड घेऊनच उभी राहिलेली गांधारी म्हटली असती "मैं शर्मिंदा... मैं शर्मिंदा... " जर असते इंटरनेट महाभारत काळात.... तर खरोखर झाले असते का हो युद्ध...? की व्हर्च्युअल जगात कौरव पांडवांची सायबर सेल झाली असती कटिबद्ध? ब्रम्हास्त्र देखील ठरले असते हॅकींग पुढे फोल... कुरुक्षेत्रातील फेसबुकने अनेकांचा डेटा, विकला असता कवडीमोल आणि केंब्रीज अॅनालिटीकाने त्यामध्ये नक्कीच केला असता झोल... तुटलेल्या चाकाचा रथ कर्णाने olxवर दिला असता विकून... आणि अभिमन्यूने देखिल चक्रव्यूह यूट्यूबवरुन घेतले असते ना शिकून... जर असते इंटरनेट