Posts

Showing posts with the label Politics

कौरवसेनेचा टाहो

Image
दुर्योधनाची मांडी फोडताच, कौरवसेना अधर्म-अधर्म ओरडायला लागली अभिमन्युला चक्रव्युहात अडकवून तहान ज्यांची होती भागली!! साधन-शुचीतेचे पुराण ज्यांना आता लागले आहे आठवू चित्रगुप्ताला ही पडला असेल प्रश्न, त्यांना नेमके कुठे पाठवू? चिरहारण होणाऱ्या सभेत भिष्मासम राहिले होते मौन पांचालीचा अपमान तेव्हा वाटला होता गौण अबला द्रौपदीला पाहून, सभेत शड्डू जेव्हा ठोकला होता हे राधासुता तेव्हा तुझा धर्म नेमका कुठे भरकटला होता? #Kansarastra

तुम्हावर केली मी मर्जी बहाल

Image
तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ शरद पवार सत्तेची तोरणं बांधून मातोश्रीवरती ही डरकाळी बेगडी, उधळीते काळजातली भीती जवळी यावं मला पुसावं, कॉमन मिनिमम प्रोग्राम खुशाल गुरगुर म्हणू की ओढ म्हणू ही गोड या बसा मंचकी, सुटल सत्तेचं कोडं विरह जाळीता मला लाचारी पत्कारली मी खुशाल मॅडम मॅडम अदबीनं तुम्ही विनवता सोनियाबाई स्वाभिमानाचा उघडला पिंजरा तुमच्या पायी अशीच न घालवावी रात साजणा, कधीतरी व्हावी सत्तेची सकाळ #Kansarastra

संजूबाबा...

Image
तुझे अग्रलेख अजिबात वाचलेले नाहीत नाही म्हणायला थोडेफार मीडियात ऐकले आहे तुझ्याबद्दल तुझ्यावर कविता लिहितोय म्हणून मला हसू नको तुझ्या हसण्याचे दिवस लवकरच संपतील... एक अँकर तावातावात तुझे स्टेटमेंट वाचत होती स्टुडिओमध्ये तुझ्या फोटो मागे काही पत्रकार नाचत होते मीडियाच्या टीआरपीनुसार तू भले हिरो असशील पण महाराष्ट्राच्या जनादेशाला तू तुडवतोय त्याचं काय....? हिंदी शायरी लिहून तू रोज टिव-टिव करतोस मित्र पक्षावर शत्रूपेक्षा अधिक प्रखर प्रहार करतोस सोशल मीडियावर भले तू अधिक चर्चेत असशील पण मराठी बाणाचा गाशा गुंडाळून टाकलास त्याचं काय...? संजूबाबा, युती तोडणं तितकं कठीण नाही नाही कठीण मुख्यमंत्रीपदासाठी तगादा लावणं इथं हिंदुत्वाच्या विरोधकांशी लढता-लढता स्वर्गीय बाळासाहेबांनी आयुष्य खपवलं होतं त्याचं काय...? अनेकांनी आपल्या जिवाचं रान केलं होतं त्याचं काय...? #Kansarastra

महाराष्ट्रातला पाऊस आणि पावसातले राजकारण

Image
महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की सगळा जातीयवाद बुडून जावा महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की भ्रष्टाचाराची चूल विझून जावी महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की घराणेशाहीच्या डोक्यावरून पाणी जावे महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की तुष्टिकरणाचं पीक करपून जावं महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाहून जावा, महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की आघाडीचं चिखल व्हावं महाराष्ट्रात एकदा इतका पाऊस पडावा, की त्या चिखलात कमळ फुलावं #Kansarastra

थंडीत पडलेले उबदार प्रश्नं

Image
देशातील राजकीय पक्षाच्या प्रमुखानी मुलाखत घेण्याची आणि देण्याची हि पहिलीच वेळ असावी बहुधा. याला राजकीय परिपक्वता म्हणवी की, दोन समदु:खी माणसांची चर्चा? हा एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे.  आपल्या फसलेल्या राजकारणामुळे सत्तेपासून लांब गेलेल्या या राजकारण्यांना थंडीच्या दिवसात जी उबदार स्वप्ने पडू लागली आहेत, ती सहजासहजी साकारली जातील, याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉमर्स महाविद्यालयाच्या मैदानावर काल बहुचर्चित अशी मुलाखत रंगली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. देशातील राजकीय पक्षाच्या प्रमुखानी मुलाखत घेण्याची आणि देण्याची हि पहिलीच वेळ असावी बहुधा. याला राजकीय परिपक्वता म्हणवी की, दोन समदु:खी माणसांची चर्चा? हा एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे.  महत्वाच्या प्रश्नांना बगल महाराष्ट्राला पडलेले प्रश्न या मुलाखतीत विचारणार असे राज ठाकरे यांनी सुरुवातील जाहीर केले. मात्र मुलाखतीतील अधिक भाग हा ठाकरे कुटुंबीय, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी आण...