सहानुभूतीच्या लाटेत जरा जपून पोहा….
कधी कधी थोडे इतिहासात डोकावून पाहिले की काही गोष्टी अधिक स्पष्ट होतात. भारतावर मोहम्मद घोरी नावाच्या आक्रमकाने इ. स. 1100-1200 च्या काळात आक्रमण केले होते, राजा पृथ्वीराज चौहान त्यावेळी भारताचा सम्राट होता. घोरीने पहिली स्वारी केली अनेक सैनीक, प्रचंड शस्त्रबळा सहीत, परंतू राजा पृथ्वीराज चौहनही काही कमी शूर नव्हता, त्याने घोरीच्या प्रचंड सैन्याचा संपूर्ण पराभव केला व मोहम्मद घोरीला तलवारीच्या धारेवर धरले. आणि अचानक त्याच क्षणी घोरीला त्याच्या चूकांचा पश्चाताप झाला, त्याने त्वरीत राजा पृथ्वीराज चौहानची माफी मागून घेतली, आणि आमच्या राजाने युद्धधर्माचे पालन करित त्यास सहानुभूती दर्शवीत जिवंत सोडून दिले. परंतू पुन्हा आक्रमण नाही करणार तो मोहम्मद घोरी कसला. त्याने पुन्हा सैन्य, शस्त्र जमवीले, पुन्हा आक्रमण केले. राजा पृथ्वीराजने त्यास पुन्हा पराभूत केले आणि परभूत होताच क्षणी घोरीस पुन्हा चुक केल्याचा पश्चाताप झाला, त्याने पुन्हा माफी मागितली आणि आमच्या राजानेही त्यास पुन्हा माफ करुन जिवंत सोडून दिले. असे एक वेळेला नाही, दोन वेळेला नाही तर तब्बल सोळा वेळी घडले. प्रत्येक पराभव