शस्त्र विक्रेता, शिकारी आणि जंगल
गंधक आणि अंदक या दोन देशांच्या सीमेवर घनदाट जंगल होते. जैवविविधतेने नटलेल्या या जंगलात अनेक पशु-पक्षी आनंदाने बागडत असत. जंगलातील मुबलक पाण्यामुळे पशु-पक्ष्यांना अनुकूल आणि पोषक वातावरण असे. पक्ष्यांना दाणा-पाणी, पशूंना भरपूर आहार या सगळ्यामुळे हे जंगल आनंदाने बहरले होते. परंतु, अचानक एके दिवशी दोन्ही देशांमध्ये जंगलावरून वाद निर्माण झाला आणि सरते शेवटी उपाय म्हणून जंगल अर्धे-अर्धे वाटून घेण्याचा तह झाला. तसेच या जंगलातील जैवविविधतेच्या संरक्षणाचा देखील करार झाला. या करारानुसार दोन्ही देश आपापल्या हद्दीतील प्राण्यांचे रक्षण आणि संवर्धन करतील असे ठरले. कराराला २० वर्षे लोटली. त्यानुसार गंधक देशातील जैवविविधतेत जवळपास पन्नास टक्के वाढ झाली, तसेच तेथील प्राण्याच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. मात्र अंदक देशाने कराराचे प्रामाणिक पालन केले नाही. तिथे शिकाऱ्यांनी उच्छाद मांडला. विविध शिकाऱ्यांनी मिळून त्या जंगलातील प्राण्यांची एक-एक प्रजाती समूळ नष्ट केली. अनेकांनी झाडं कापून वस्त्या निर्माण केल्या. परिणामी, तेथील प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. शिकारी आणि इतरा