जास्त कपडे धुवायला काढू नका', तिने म्हटले. का बरे? तो म्हणाला. 'नाही, आपली काम वाली बाई २ दिवस येणार नाही'. कशासाठी? 'गणपतीसाठी २ दिवस नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहे, असे बोलली'. 'ठीक आहे, नाही काढत जास्त कपडे धुवायला', 'आणि, हो, तिला गणपतीसाठी ५०० रुपये देते, सणासाठी बोनस म्हणून'. 'कशाला, आता दिवाळी आलीच, तेव्हा देऊया',. 'नाही रे, गरीब बाई ती, हौशेने नातवाकडे जातेय तर तिलाही बरे वाटेल', अन ह्या महागाई मध्ये त्यांच्या पगारात कसा सण साजरा करणार ते'? 'तू ना, खूपच भावनिक होतेस', 'नाही रे, काळजी करू नकोस', मी आजचा पिझ्झा खाण्याचा बेत रद्द करते', सहज ५०० रुपये उडतील त्या ८ पावाच्या तुकड्यामागे', ती हसत बोलली. 'वा वा, फार छान, तू पण शहाणी आहेस', आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात'. ३ दिवसानंतर 'काय मावशी, कशी झाली सुट्टी', त्याने कामवाल्या मावशीला विचारले. 'खूप छान झाली', ताईने ५०० रुपये दिले होते मला, सणाचा बोनस म्हणून',. 'मग जाऊन आली का नातवाकडे...
कण कण वाढत असतात क्षण हे आयुष्याचे गत काळाची प्रसंग पूसून वारे धावती बदलाचे सार संपून जाव वाटत, अशी विषण्णता येते सार थांबून ठेवाव वाटत, अशी अनुकुलता होते पण .... क्षण हा थांबत नाही कधी काळासोबत चालत जातो आयुष्याच्या वाटेवरती उजेड-अंधार होतच राहतो काळाचे हे गणित सारे कुणावाचुन अडत नसते चढ-उताराच्या रस्त्याने आयुष्य देखील सरकत असते सगळ काही थांबत नाही, साचून काही राहत नसते परिवर्तनाच्या वरदानाने किनारा गवसण्याची आशा असते " हे ही दिवस जातील .." या विश्वासने वाटचाल करू दुखाच्या काळी विश्वास अन् आनंदात भान राखु आयुष्यासोबत नेहमी आपण पुढे जात राहायला हव भूतकाळाचे बोट सोडून येणार्या ऋतुच स्वागत करायला हव आणि साचलेपणा येऊ न देता परिवर्तन घडवायला हव -हर्षल कन्सारा
सूर्य कधी मावळत नसतो, मावळतो तो क्षण मावळतात छटा काहीश्या, नसते मावळत प्राक्तन सूर्याचे मावळणे, म्हणजे त्याचा अस्त नव्हे क्षणभराची गाथा ही , जग नेहमीच अंधारग्रस्त नव्हे सूर्याच्या जाण्याने असतील उंचावत काही शक्ती आत्मविश्वासाची ही कसोटी बाळगू नका धास्ती अंधाराचा होईल अस्त, मिटेल थैमानाचा गुन्हा तेवत ठेवा विचार हा, की सूर्य उद्या उगवेल पुन्हा.... - हर्षल कंसारा
Comments
Post a Comment